Posts

जोडूया धागा पर्यावरणाशी

            वड, पिंपळ, कडूनिंब, आंबा अशी अनेक उपयुक्त झाडे पर्यावरणाचे संतुलन अबाधित ठेवतात. कडुनिंबाच्या झाडाखाली थंडावा मिळतो. वडाच्या झाडाचे तर अगणित फायदे आहेत.  वड अक्षय्य आहे. एका छोट्या बीजापासून निर्माण होणारे हे झाड अतोनात वाढतं. समाधिस्थ साधूच्या आश्रयाखाली प्राप्त होणारी शांतता, या झाडाच्या छायेखाली जाणवते.         वडाच्या पारंब्या जमिनीला टेकून, जमिनीत स्वतःला रुजवून घेत, नवीन झाड तयार होतं. सृजनाचं हे अचंबित करणारं रूप म्हणजे हा #वटवृक्ष!         या झाडाच्या पानांनी आद्रता शोषून घेऊन ओलावा टिकून राहतो. कित्येक हजार पटीने हवेतील धूळ-धूर शोषून घेऊन प्राणवायू निर्माण करण्याची प्रक्रिया हा वृक्ष करतो. हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड शोषून घेऊन हवेत प्राणवायू सोडण्याची त्याची क्षमता कैक पटीने जास्त आहे.             आजूबाजूचा कित्येक मैल परिसर एका वडाच्या झाडामुळे प्रदूषणमुक्त राहू शकतो. त्याचे गुण अगणित आहेत. तो औषधीयुक्त आहे. कित्येक आजारांवर तो गुणकारी आहे.     ...

मन वढाय वढाय

            फोनची रिंग वाजली. तिने फाईल वरून नजर हटवित," यावेळेस कुणाचा फोन?" म्हणत फोनच्या स्क्रीन कडे एक नजर टाकली. "अहो" calling...." यावेळेस मनीष चा फोन!" तिला आश्चर्य वाटले. "आज तर याची मिटींग होती ना! वेळ झाला, उशिर होईल म्हणून टिफिन देखील नेला नव्हता. सकाळी लवकर ची ट्रेन पकडायची होती म्हणून लवकरच घराबाहेर पडला. आज बोलणेही झाले नाही आमचे! म्हणून तर नसेल ना केला फोन??" मृणालच्या मनाच्या कॅनव्हासवर सेकंदात, झरझर विचार उमटले. गाडीला ट्रॅक बदलायला जेवढ्या सेकंदाचा अवधी लागतो, तेवढ्या सेकंदभर क्षणात विचारांचे तरंग मनात उठतात. विचारांना काही थांगपत्ताच नसतो. एका मागोमाग एक विचार पिच्छा पुरवतात आणि मग पुरती दमछाक होते. या विचारांना थोपवून परत पूर्व मनस्थितीत येईपर्यंत विचारांनी घोळ केलेला असतो आणि पहिल्या विचाराशी शेवटच्या विचाराशी काही मेळ लागत नाही. शेवटी शून्य अवस्थेत ती शेवटच्या विचाराला थोपवते.          हे मृणालचे अतिविचारी आणि भावनाशील मन तिलाच मानसिकरित्या थकवते. तिने विचारांची शृंखला थांबवित फोन रिसीव्ह केला. " हॅलो मृणाल, लं...

मनमानसी

मनच ते माझं! सतत बोलत असतं. स्वगतच जणू! अखंड अविरत‌. कोणाचे लिखित शब्द, मौखिक बोल मग कानापर्यंत त्यावेळी पोहोचतच नाही. मनाचाच मनाशी एकतर्फी संवाद चालला असतो. डोळे फक्त भावरहित बघत असतात, तटस्थ होऊन.  नदीचा अखंड प्रवाह फक्त बघत राहायचा. पात्रात पाय रोवून उभे असतानाही पायाचा विळखा सोडवून घेत, पाण्याने जसे आपल्याच तालात पुढे पुढे प्रवाही राहायचे... तसा हा मनाचा प्रवाह.... मनाचा संवाद मीच साधलेला! मनमानसी! _वीणा विजय